Okay...
Okay…
'Hmm,Okay' असे शब्द आजकाल माझ्या फार डोक्यात जातात.'Whatsapp,Facebook' कुठेही Hmm,Okay अशाप्रकारच्या शब्दांचे रिप्लाय आले कि डोके आपटून घ्यावेसे वाटते. संवादाला कुठेतरी सुरुवात होत असताना मोबाईलच्या स्क्रिन वर असे शब्द झळकले कि क्षणार्धात मोबाईलचे तुकडे करावसे वाटतात.माझे चिडण्यामागचे एवढंच कारण आहे कि लोक मुद्दामून अशा शब्दांचा वापर करतात.
संवाद हि दोन माणसांची ओळख होण्याची पहिली पायरी असते पण असे शब्द त्यामधे अडथळा निर्माण करतात.संवाद सुरू होत
असताना अशा शब्दांची गरज नसते.सुरु होणारा संवाद लगेच बंद करण्याचे काम असे शब्द करतात.अशा शब्दांच्या वापरामुळे
माणूस जोडण्याचे काम करणारा संवाद फिका पडतो.दोन लोकांच्या संवादामधे एखाद्या माणसाला बोलायचे असते,मनातील सर्व
सांगायचे असते,रोजच्या आयुष्यातील घटना सांगायच्या असतात पण असे शब्द वापरल्यामुळे तो निराश होतो.निराश झाल्यावर
पुढे त्याची संवाद साधायची इच्छा निघून जाते.
असे स्पष्ट का बोलत नाही याचे मला अद्याप कारण सापडलेले नाही.समोरच्या माणसांची किम्मत शून्य ठरवून हे
बिनधास्त Hmm,Okay शब्दांचा वापर करतात तर कधी कधी Ttyl या शब्दाचा वापर करतात.
लोकं काहीवेळा दुसरा कुठला रिप्लाय न सुचल्यामुळे Hmm,Okay अशा प्रकारच्या शब्दांचा वापर रिप्लाय देण्यासाठी करतात.यावेळी त्यांना दोष देता येत नाही कारण समोरचा माणूस त्यावेळीस नीट संवाद साधत नसतो पण माझ्या मते अशावेळीस
Hmm,Okay असे शब्द टाळून संवादात वेगळ्या विषयांवर बोलायला हवे. वेगळ्या गोष्टींवर विषय गेला कि असे शब्द
आपोआप मागे पडतात.
आपोआप मागे पडतात.
साधण्यासाठी वापर करताना आपण भान राखले पाहिजेल.समोरून भेटताना आपण मुख्यतः Hmm,Okay असे शब्द फार कमी वापरतो.आपला फारच मुक्त संवाद होतो.मुक्त संवादामुळे आपण लगेच एकमेकांशी जोडले जातो पण ऑनलाइन प्रकारात तेवढाच
मुक्तपणे संवाद साधला जात नाही.मनातील भावना इमोजी द्वारे बाहेर पडतात.इमोजी वरून व्यक्तिच्या भावना ओळखल्या जातात.
जेवढा समोर जाऊन,भेटून,बोलून जिवंत संवाद साधला जातो तेवढ्याच ताकदीचा ऑनलाइन संवाद होत नाही हे वास्तव आहे आणि तो झाला तरी त्याच्या आधारावर झालेली नविन नाती जास्तकाळ टिकत नाहीत.मानवी आयुष्यात संवाद हा फार महत्वाचा आहे.संवादाचा योग्य वापर व्यक्तीला जास्तीतजास्त चांगली व आयुष्यभर साथ देणारी माणसे जोडून देतो.
मुक्तपणे संवाद साधला जात नाही.मनातील भावना इमोजी द्वारे बाहेर पडतात.इमोजी वरून व्यक्तिच्या भावना ओळखल्या जातात.
जेवढा समोर जाऊन,भेटून,बोलून जिवंत संवाद साधला जातो तेवढ्याच ताकदीचा ऑनलाइन संवाद होत नाही हे वास्तव आहे आणि तो झाला तरी त्याच्या आधारावर झालेली नविन नाती जास्तकाळ टिकत नाहीत.मानवी आयुष्यात संवाद हा फार महत्वाचा आहे.संवादाचा योग्य वापर व्यक्तीला जास्तीतजास्त चांगली व आयुष्यभर साथ देणारी माणसे जोडून देतो.
Well said! Enjoyed reading the article! Keep writing such posts.
ReplyDeleteThank you :) btw who are you?
Delete