हिंदी चीनी भाई भाई?

Sunday, 27 August 2017

हिंदी चीनी भाई भाई?



  मानवी संस्कृतीच्या उदयासह युद्ध संस्कृतीचा देखील उदय झाला.काळानुसार युद्ध संस्कृतीत बदल घडत गेले.भारतात इंग्रज येण्यापूर्वी भारत हा देश छोट्या छोट्या संस्थानांमधे विभागला गेला होता.सगळे राजे आपआपल्या संस्थानांच्या सीमा वाढवण्यासाठी प्रयत्नशील होते.युद्धातूनच कुठलीही संपन्नता प्राप्त करणे हाच त्यांचा मोठा उद्देश्य होता.काळानुसार त्या युद्धसरणीत सुद्धा बदल घडत गेले.छोट्या छोट्या वादातून सुद्धा युद्धाची परिस्थिती निर्माण होत गेली.इतिहासात झालेल्या दोन महायुद्धांचे उदाहरण घेतले तर ही युद्धे आपल्याला टाळता आली असती पण तरीसुद्धा ही युद्धे झाली आणि आजपर्यंत त्यांचे पडसाद अजूनही मनपटलावर कायम आहेत.



  प्राचीन काळातील युद्धे किंवा आधुनिक विश्वयुद्धे ही सर्व छोट्या कारणाने सुरू झाली आणि नंतर त्यांनी विशालकाय रूप धारण केले.आज युद्ध हे केवळ सैन्यापुरतेच मर्यादित न राहता ते मानवी संस्कृती संपवण्यासाठी कारणीभूत ठरेल अशी धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे.इतिहासामधील उदाहरण घेतले तर आत्तापर्यंत झालेल्या युद्धांमधे मानवहानी बरोबरच कला,संस्कृती इत्यादी गोष्टींचा देखील नाश झालेला आहे.आधुनिक काळात झालेल्या युद्धांमधे सैन्यांबरोबरच अनेक मुले,स्त्रिया,वृद्ध माणसे व सामान्य नागरीक सुद्धा बळी पडले ज्यांचा युद्धांशी काडीमात्रही संबंध नव्हता.युद्धांचे एवढे गंभीर परिणाम आहेत हे महित असून सुद्धा युद्धे ही घडलेली आहेत.  





  सद्य स्थितीचा अभ्यास करताना देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि यासाठी भारत आणि चीन यांच्यामधला तणाव कारणीभूत आहे.चीनमधली आर्थिक परिस्थिती बिघडलेली असून त्यांना त्यांच्या देशातील मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा माल`निर्यात करायला अडचण होत आहे.सध्या जगामधे असलेली आर्थिक मंदी यामागचे कारण आहे.तर हा सगळा देशातंर्गत होणारा राजकीय असंतोष दबविण्यासाठी बाह्य शत्रू दाखवण्याची गरज भासते त्यासाठीच चीन हा भारताशी कुरापत काढत आहे. डोकलामचा तिढा कायम असताना चीनने सिक्किमबद्दल आक्रमक वक्तव्य करण्यास सुरुवात केलेली आहे यावरून चीनला कुठलीही गोष्ट धाक दाखवून साध्य करायच्या आहेत हे दिसून येत आहे.

  या सगळ्यात पकिस्तानची भूमिका बघणे जास्त महत्वाचे ठरते.सध्या चालू असलेल्या डोकलामच्या संघर्षासाठी पाकिस्तान कारणीभूत आहे असे मला वाटते कारण प्रत्येक ठिकाणी पाकिस्तान हा भारत विरोधी असल्याचे दाखवतो.यासाठी पाकव्याप्त काश्मीरमधे असलेला चीन व पाकिस्तान यांचा इकोनॉमिक कॉरिडोर हे उत्तम उदाहरण ठरेल.चीनने साठ अब्ज डॉलर्स खर्च या कॉरिडोरवरती केलेला आहे.पण जर उद्या भारत आणि पाकिस्तान या देशांचे संबंध बिघडले आणि जर भारताने या कॉरिडोरवरती दबाव आणला तर चीनचे साठ अब्ज डॉलर्स पाण्यात जातील.ही चिंता सध्या चीनला भेडसावत आहे आणि यासाठीच आपलं लक्ष दुसरीकडे वळवण्याचे काम चीन वेगवेगळ्या पद्धतींने करत आहे. 

  


  या सर्व पार्श्वभूमीवर युद्ध होण्याचे संकेत फार कमी आहेत पण आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि चीन हा देश वाटतो तेवढा शक्तिशाली नाही आणि भारत हा देश वाटतो तेवढा दुर्बळ नाही.सध्या केलेली अमेरिका आणि इस्त्राईलशी मैत्री व अमेरिका,जपान त्यांच्याबरोबर संयुक्तपणे केलेला युद्धसराव ह्या भारताच्या जमेच्या बाजू ठरतील यात तिळमात्र शंका नाही. सध्याचा भारत हा ६२ चा भारत नाही हेही आपण लक्षात घ्यायला हवं.सध्या असलेलं अजित कुमार डोवाल तसेच मा. पंतप्रधान नरेंद्र  मोदींजींचे नेतृव देखील आपल्याला फायदेशीर ठरेल.

  युद्ध हे अटळ असते असे  म्हणतात पण आपण जर एकत्र येऊन शांतपणे चर्चा केली तसेच एकत्रित प्रश्न सोडवले तर युद्धाची गरज नसते असे मला वाटते.जर आत्ता युद्ध झाले तरी सुद्धा हा भारत १९६७ मधल्या भारतासारखा युद्धाला तोंड देईल यात कुठलीही शंका नाही.  




x

0 comments :

Post a Comment