Home » All posts
Saturday, 26 October 2019
Sunday, 7 April 2019
असे पाहुणे येती....
05:03 mayur wagh
| भिगवणची सांज |
![]() |
| रोहित अर्थातच फ्लेमिंगो पक्षी |
| चमच्या |
| चित्रबलाक आणि चमच्यांचा समूह |
![]() |
| रोहित |
| सकाळच्या प्रहरी चित्रबलाक पक्षी न्याहारीचा आस्वाद घेताना |
| भिगवणची संध्याकाळ |
भिगवण परिसरात यावर्षी झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणसाठयात पाण्याचा फुगवटा जास्त आहे. यामुळे अगदी काठाकाठावर दिसणारे पक्षी कमी असून, हातात पुरेसा वेळ घेऊन गेल्यास, सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा गाठल्यास पाणसाठयावर नांदणाऱ्या अनेक पक्ष्यांचे दर्शन हमखास होईल. सूर्योदयाच्या सुमारास पाखरांची पाणवठयावर येण्यासाठी सुरू झालेली लगबग, रात्रीच्या विश्रांतीने ताजीतवानी होऊन आपले भक्ष्य म्हणून लहान पक्ष्यांना घाबरवणारी घार आणि तिच्या मागे जीव तोडून आणि जिवावर उदार होऊन लागणारा कोतवाल, थंड पाण्यात खोलवर डुबकी मारून ओले झालेले पंख सुकवण्यासाठी उन्हात बसलेले पाणकावळे, आपले उंच पाय आवरत तुरुतुरु धावणाऱ्या शेकाटया, विजेच्या उंच खांबावर बसलेला मच्छीमार अशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतची भिगवणची 'उडती दुनिया' पाहण्यासाठी भिगवणला एकदातरी जायलाच हवे.
Sunday, 2 September 2018
मिसळ आणि मी!
11:28 mayur wagh
मिसळबद्दल काय बोलायचे? पुण्याचे असाल तर मिसळबद्दल आपसूकच प्रेम निर्माण होते. पुण्यात राहून जर चांगली मिसळ खायची असेल तर ती नक्की कुठे मिळते हे माहित असायला हवे आणि हे जर माहित करून घ्यायचे असेल तर 'य' प्रमाणात पुण्यातील सर्व मिसळींचा मनसोक्त आस्वाद घ्यायला हवा!
मी देखील चांगल्या मिसळीचा शोध घेताना अनेक मिसळींचा आस्वाद घेतलेला आहे आणि त्यात ज्या मिसळीची चव अजूनही जिभेवर रेंगाळून राहिलेली आहे ती म्हणजे 'रामनाथची मिसळ'.
मी पुण्याचा असलो तरी सुरूवातीला मला रामनाथ मिसळ माहित नव्हती. शाळेत असताना फक्त पोहयांबद्दलच प्रेम होते त्यामुळे बाहेर कधी मिसळ खायचा प्रश्न आला नाही. घरीच मिसळ खाऊन व्हायची. सुरुवातीला तिखट खात नसल्यामुळे अळणी मिसळच आवडायची. फक्त फरसाण 'य' प्रमाणात खायला मिळते म्हणून मी मिसळ खायचो. पण जेव्हा कॉलेजमध्ये आलो तेव्हा खरे मला मिसळीचे महत्व कळले. काॅलेजमुळे बाहेर जास्त वेळ असायचो. आणि वडापाव तरी किती वेळा खायचे मग वेगवेगळ्या ठिकाणी मिसळी ट्राय करायला लागलो. काॅलेजच्या कॅन्टीन पासून त्याची सुरुवात केली. या सगळ्या ट्राय प्रकरणामुळे मिसळींच्या किती अनेक प्रकारच्या टेस्ट असू शकतात याचा प्रत्यय आला. तिखट, खारट आणि गोड यांच्या पलीकडे पण काही चवी असू शकतात याची जाणीव मला तेव्हा झाली. पुण्यातील वेगवेगळ्या भागांनुसार त्या ठिकाणी मिळणाऱ्या मिसळीची चव ठरते असा कयास मी बांधला. असंच मग सर्व ठिकाणच्या मिसळी ट्राय करताना माझा संबंध रामनाथशी आला. याला दुसरे कारण म्हणजे माझ्या मित्रांनी पुण्याची खाद्यसंस्कृती हा विषय घेऊन रामनाथ मिसळीवर बनवलेला व्हिडिओ. तो व्हिडिओ पाहून रामनाथला जायचा मोह आवरला नाही. आणि मग एके दिवशी तो सुदिन उगवला जेव्हा मी रामनाथची मिसळ पहिल्यांदा खाल्ली आणि ती चव मला मनापासून आवडली. मी जरी तो व्हिडिओ पाहिला नसता तरी मला रामनाथची मिसळ आवडली असती यात तिळमात्र शंका नाही.
रामनाथची मिसळ आवडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे त्याचे टिकून असलेले जुनेपण. तीच जुनी चव अजूनही अस्तित्वात आहे यातच रामनाथचे मोठेपण दिसून येते. तर्री, शेव, कांदा, आणि जोडीला लिंबू अशा साध्यासोप्या मिसळीच्या मांडणीमुळे ती मिसळ खावीशी वाटते. नव्या पिढीचा विचार करून जर त्यांनी मिसळीत बदल केले असते तर खऱ्या पुणेकराला कदाचित ती मिसळ आवडली नसती पण तरीही त्यांनी तीच चव आणि मिसळ कायम ठेवली म्हणून सगळ्या नव्यापणात सुद्धा त्यांचे जुनेपण अस्सल टिकून आहे. मग जरी आत्ता चुलीवरच्या मिसळीचे फॅड आले तरी ज्याला खरंच मिसळीचा 'गंध' आहे तो जुन्याकडेच जाईल याची मला खात्री आहे.
ता.क. घरगुती, चुलीवरची, तुपातली, झणझणीत, गरमागरम, खरपूस, ठसकेबाज, चवदार, तर्रीबाज, झन्नाटेदार (रामबंधूची कृपा) इत्यादी प्रकारच्या मिसळी खायला कृपया आम्हाला बोलवू नये! जाहीर अपमान करण्यात येईल. आमच्या हदयात रामनाथचे अढळ स्थान आहे. आम्हाला तिकडचीच मिसळ मनापासून आवडते.
रामनाथच्या आधी वेगवेगळ्या मिसळी ट्राय केल्यामुळे त्यातल्या काही निवडक मिसळींची यादी पुढे देतोय! ती कृपया पाहून घ्यावी पण पुण्यात राहात असताना कायम लक्षात ठेवावे की मिसळ खायची असेल तर रामनाथ शिवाय पर्याय नाही!
इकडची मिसळ बरी आहे!
श्रीकृष्ण भुवन, तुळशीबाग.
काटाकिरर मिसळ, कमिन्स कॉलेज रोड.
मस्ती मिसळ, कर्वे रोड, कोथरुड.
माझ्या मित्रांनी तयार केलेला व्हिडिओची लिंक :
https://youtu.be/idrOkcMQaK8
आणि हो पावापेक्षा ब्रेड बरा!!!!
Sunday, 26 August 2018
पोहे आणि मी!
08:28 mayur wagh
- उभे स्पोर्ट्स, ज्ञान प्रबोधिनी जवळ, राधिका भेळ
च्या शेजारी.
- कमिन्स काॅलेजजवळ (योग्य पत्ता लवकरच अपडेट करतो)
- देसाई बंधू आंबेवाले, कर्वे रोड, कोथरुड. (वेळ बघून जावे,
दिवसाढवळ्या फिरकू नये)
- वैष्णवी स्नॅक्स सेंटर, एचपी पेट्रोल पंपाच्या
शेजारी, जंगली महाराज रोड.
Saturday, 18 August 2018
चहा आणि मी!
08:05 mayur wagh
- फर्ग्युसनमधले अण्णाचे कॅन्टीन.
- फर्ग्युसनच्या चौथ्या गेट बाहेरील
चहाची टपरी.
- येवले चहा, हत्ती गणपती समोर.
- जय भोलेनाथ टी हाऊस, पत्र्या मारूती चौक.
Thursday, 15 February 2018
मनसे : कालची, आजची व उद्याची!
02:24 mayur wagh
मराठी अस्मितेच्या मुद्द्यामुळे तसेच उत्तर प्रांतियांविरुद्ध केलेल्या आंदोलनामुळे त्यावर्षीच्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसेला मोठे यश मिळाले. पुणे, मुंबई, नाशिक व ठाणे येथे मनसेचे १३ आमदार निवडून आले. नंतर ४ आॅगस्ट २०११ रोजी राजसाहेबांनी गुजरातचा दौरा केला. मोदींच्या रुपाने राजसाहेबांना त्यांचा पहिला राजकीय मित्र मिळाला. याचे उदाहरण द्यायचे झाले तर मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी राजसाहेबांनी त्यांना दिलेला पाठिंबा. मोदींनी सुद्धा या मैत्रीचा आदर ठेवत मनसेने तयार केलेल्या महाराष्ट्राच्या विकासाच्या ब्लू प्रिंट मधले काही निर्णय अस्तित्वात आणले व त्यावर कामही सुरू केले.
मराठी अस्मितेच्या मुद्द्यामुळे २०१२ मधे नाशिकला मनसेचा महापौर झाला तसेच पुण्यात मनसेने विरोधी पक्षनेतेपदापर्यंत मजल मारली. याबरोबरच तेव्हा मनसेला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत २७ जागांवर यश मिळाले. पक्षाच्या वाढत्या वाटचालीबरोबरच मनसेने मराठी अस्मितेसह हिंदुत्वाचाही मुद्दा धरला. पण २०१४ रोजी झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमधे मनसेला सार्वत्रिक पिछेहाटीचा सामना करावा लागला. यामुळेच कदाचित राजसाहेबांची जनमानसांत असलेली लोकप्रियता कुठेतरी कमी होत आहे का याची जाणीव होण्यास सुरुवात झाली.
याचाच प्रत्यय २०१७ च्या मनपा निवडणुकांच्या निकालांमुळे सर्वांना आला. यामुळे मनसेच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. नाशिकमधे सुटलेली सत्ता व मुंबई, पुण्यात झालेली पक्षाची पडझड यावरुन सुरुवातीच्या काळात असलेला 'राज ठाकरे' या नावाचा करिष्मा आता कुठेतरी कमी झालाय का ही चर्चा सर्वत्र सुरू झाली. टोलबंदीचे फसलेले आंदोलन, सेटलमेंट चा शिक्का, निवडणुकीपूर्वी झालेली पक्षांतरे अशा विविध समस्यांमुळे पक्ष लोप पावण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
या नव्या वर्षात मराठी जनांच्या मनावर मनसेची लोप पावलेली लोकप्रियता परत आणण्याचे अवघड काम मनसेला पर्यायाने राजसाहेबांना करावे लागणार आहे. याचीच सुरुवात फेरीवाल्यांविरोधात केलेल्या आंदोलनाने झाली असली तरी खरी सुरुवात ही राजसाहेबांनी व्यंगचित्रांच्या मार्फत केलेली आहे. राज ठाकरेंपर्यंत पोहोचता येत नाही अशी तक्रार मनसे सोडून गेलेले नेते करत असतानाच आता व्यंगचित्रांमार्फत राजसाहेब लोकांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मनसेची नवीन उभारणी व विरत चाललेली लोकप्रियता परत आणण्याचा प्रयत्न राजसाहेबांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून सुरू केलेला आहे.
डिजिटल प्लॅटफॉर्ममधून थेट लोकांपर्यंत जास्त लवकर पोहोचता येते यासाठीच त्यांनी पक्षाची भूमिका मांडण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा जास्तीत जास्त वापर करण्यास सुरुवात केलेली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करताना या तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या पक्षाचे स्थान बळकट करण्याच्या दृष्टीने मनसेने आपले पाऊल टाकलेले आहे. जुन्या मुद्द्यांना, विचारांना तसेच पक्षीय धोरणांना बगल न देता डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून त्यांना दिलेले स्वरूप नक्कीच मनसेची नवीन सुरुवात करण्यास कारणीभूत ठरेल यात तिळमात्र शंका नाही.












